Sunday 10 May 2020

कोरोना covid 19 बदलनारी उद्योग परिस्थिती आणी नवीन संधी ...

Covid 19 आणी देशाची अर्थव्यवस्था
कोरोना मुळे बदलणारी देशाची अर्थव्यवस्थेवर त्यावर होणारे दुष्परिणाम आणी त्यातुन निर्माण होणाऱ्या उद्योग संधी ,नवीन वाटा आपण या ब्लॉग मधे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ .

चीन मधुन या व्हायरस ची सुरवात झाली आणी संपुर्ण जग आज लॉकडाऊन झालं .... लॉकडाऊन मुळे संपुर्ण जगाचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहॆ . एकाच वेळीसंपुर्ण जग लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहॆ यापू असं झाल्याचं कोणताही उदाहरण इतिहासात नाही .याचे दूरगामी परिणाम जगाच्या अर्थ व्यवस्थेवर होणार आहेत .अमेरिका ,स्पेन ,इटली या सारख्या मोठया प्रगत देशांना याचा चांगलाच फटका बसला आहॆ , संपुर्ण देश आज एका भीतीच्या सावटा खाली आहॆ , भारतात कोरोनाचा प्रसार त्या मानाने  सावकाश होत आहॆ ,याला भारतीय संस्कृती आणी जगण्याच्या पद्धतीतील विविधता हे कारण असु शकते... त्यामुळे भारतावर त्याचा परिणाम कमी आहॆ असे बऱ्याच जणांकडून बोललं जात आहॆ , आणी म्हणुनच बाकीच्या देशानं पेक्षा आपल्या देशात आर्थिक नुकसान कमी होईल असा अंदाज ही लावला जातोय ... परंतु आपण हा ही विचार केला पाहिजे की भरत हा अजुनही अमेरिका, जपान इतका प्रगत नाही विकसन शील देश आहॆ शिवाय लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाला आहॆ. आणी महत्वाचं म्हणजे 138 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात वर्ल्ड बँकेच्या 2011 च्या सर्वे नुसार  फक्त
हायर अप्पर क्लास फक्त 1% आहेत (अंबानी ,टाटा ,बिर्ला यांच्या कडे देशातली सर्वात जास्त संपत्ती केंद्रित आहॆ ) तर हायर मिडल क्लास 3% तर लो इन्कम 76.9%  आणी दारिदय रेषेखालीजवळपास 20%आहॆ ..प्रगत देशात या उलट परिस्थिती दिसुन येते .हे सांगण्याचं कारण असं संपत्तीचं केंद्रीकरण झाल्याने कोरोनाचा सर्वात जास्त फटका मिडल क्लास आणी लोवर क्लास लोकांनाच बसणार आहॆ .
आर्थिक तज्ज्ञांच्या मते आणी वर्ल्ड बिझनेस ऑर्गनायझेशन नुसार भारतात 20% ते  57% लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहॆ . 53% उद्योग क्षेत्रावर  कोरोनाचा परिणाम होत आहॆ .तर भारतात रोज 32 हजार कोटींचं नुकसान होत आहॆ .याचाच परिणाम लेबर वर्ग ,कामगार वर्ग यांच्यावर मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहॆ हे आपण रोज पहाताच आहोत. त्यांच्यावर उपास मरीची वेळ आली आहॆ म्हणुनच प्रत्येक जण आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहॆ . हे सर्व खरं तर खुप भयानक आहॆ .देशात कोरोनाचा प्रसार बाकीच्या देशांच्या मानाने कमी असला तरी याचा परिणाम किती आणी कुठपर्यंत होईल हे सांगणे लगेच अवघड आहॆ .
यासाठी वर्ल्ड ऑर्गनायझेशने या परिस्थितीला 3 कर्व मधे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ.
Economical Curves


पहिला v कर्व म्हणजे कोरोना आला आणी वेगाने अर्थव्यवस्था खाली गेली पण कोरोना 2 ते 3 महिन्यात लगेच गेला तर त्याच वेगाने अर्थव्यवस्था पुन्हा वर येईल , दुसरा U कर्व यात कोरोना आला आणी काही काळ म्हणजे 4-6 महिने थांबला आणी गेला तर अर्थव्यवस्था वेगाने खाली येईल काही काळ स्थिर राहील  पुन्हा वाढीला लागेल तर तिसरा कर्व म्हणजे L यात कोरोना चा प्रादुर्भाव जास्त काळासाठी राहिला म्हणजे साधारण 6 महिन्या पेक्षा जास्त राहिला तर अर्थव्यवस्था पुन्हा वर येण्यासाठी बराच वेळ लागेल .आणी ही परिस्थिती देशासाठी खुप गंभीर असेल.
तिसरा कर्व येणार नाही असा अंदाज आहॆ . दुसऱ्या कर्व चे परीणाम आपल्या देशात दिसतील अशी परिस्थिती आहॆ .
त्यानुसारच आपण उद्योग आणी व्यवसाय वर कसा परीणाम दिसुन येतो ते ही पाहू ..
Covid 19.... मुळे धोक्यात असणारे उद्योग ..
1.  एअरलाईन्स ,हॉटेल आणी टुरिजम
2.  ऍटोमोबाइल इंडस्ट्री
3.  रियल इस्टेट आणी त्या शी रिलेटेड बिल्डिंग मटेरिअल ,          सिमेंट .
4.  होम & ऑफिस फुर्निचर
5.  प्रिंटिंग आणी स्टेशनरी ,गिफ्ट , बुक्स
या सेक्टर वर सर्वात जास्त परिणाम कोरोनाचा होईल परिणामी यावर अवलंबून असलेल्या उद्योगांवर ही छोटे उद्योग , midc मधील वर्क शॉप यावर बंद होण्याची वेळ येऊ शकते.
यामुळेच भारतात बऱ्याच नोकऱ्या जातील तर काहींच्या पेयमेन्ट मधे घट करण्याचे निर्णय कंपनी मालकांना घ्यावे लागतील . बेरोजगारी वाढेल आणी शिक्षण घेऊन नुकतेच बाहेर पडलेल्या तरुण वर्गाला नोकरी मिळणे ही अवघड असेल . सांगण्याचं कारण की कोरोनाचा एवढा मोठा परिणाम होत असताना लॉकडाऊन चा गाम्भीर्य आणी अर्थ आपल्याला कळत नाही .त्यात आता लॉकडाऊन शिथिल होत आहॆ त्यामुळे याचे धोकेही तितकेच वाढले आहेत . काळजी घेणे आणी नियमांचं पालन करण गरजेचं आहॆ ... भीती सर्वांनाच आहॆ या परिस्थिती शी योग्य पद्धतीने जुळवून घ्यावं लागेल .
लॉकडाऊन सरकार जास्त दिवस ठेवु शकत नाही त्यामुळे आता आपल्याला जगण्याचे नियम बदलून याच्याशी जुळवून घ्यावं लागेल . आपलं राहणे ,खाणे ,वागणे काम करण्याची पद्धत सर्वच बदलावी लागेल , कोरोनाच्या परिस्थितीला ऍडजेस्ट करून नवीन नियम बनवावे लागतील तरच यातुन आपण व्यवस्थित बाहेर पडु ...

कोरोनातून निर्माण होणाऱ्या साधी 

कोरोनाची एक बाजू आपण बघितली आता दुसरी बाजू ही बघु .म्हणतात ना एका नाण्याला दोन बाजू असतात तश्या यालाही आहेत प्रत्येक वाईट परिस्थिती नंतर एक नवीन सुरवात असते ,आणी नवीन संधी ही निर्माण होत असते तसे कोरोनामुळे बऱ्याच नवीन साधी ही निर्माण झाल्या आहॆत .

अर्थव्यवस्थेला नवीन संजीवनी देणारे महत्वाचे मुद्दे  
1. देशाची लोकसंख्या जास्त असली तरी यात तरुण वर्ग जास्त आहॆ वर्ड डेमोग्राफिक ऑफ इंडिया च्या सर्वे नुसार 60% लोकसंख्या 20 te 60 ,वयोगटातील आहॆ आणी पुढच्या वर्षापर्यँत भारताच ऍव्हरेज एज 29 असेल म्हणजे सर्वात जास्त तरुण देश म्हणुन आपण ओळखले जाऊ .
2. हा व्हायरस चायनातून आल्यामुळे सर्व देशांची नाराजी चायना वर आहॆ याचाच परीणाम, बऱ्याच देशांनी चीन मधील असणारी त्यांनी इन्व्हेस्टमेंट हटवुन भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत ,300 कंपन्यांनी तशी पसंती दर्शवली आहॆ त्यातील 100 कंपन्यांनी बोलणी आणी सर्वे चालु केला आहॆ ,यामुळे खुप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणी लघु सुरु होतील .
3. आपला देश आजही कृषी प्रधान देश आहॆ 68.34% लोक आजही शेती करतात त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यात सर्वात जास्त वाटा शेती आणी त्यावर अवलंबुन असणाऱ्या उद्योगांचा असेल. कृषी क्षेत्रात 3% वाढ होण्याची शक्यता आहॆ .खऱ्या अर्थानं शेतकरी राजा असेल . शेती उपादने आणी शेती प्रक्रिया उत्पादने यांना चांगले मार्केट सध्या ही मिळत आहॆ .
 ही आपली जमेची बाजू आहॆ. कोरोना नंतर देशाचा चेहरा बदलेल, आर्थिक नवीन निकष तयार होतील . कृषी उद्योग लघु उद्योग ,महिला उद्योग याकडे दुर्लक्ष केलं गेले यात आता चांगली संधी निर्माण झाली आहॆ . कोणत्या उद्योगांना चांगले दिवस येतील , आणी कोणता उद्योग करणे आता हिताचे असेल ते आता बघु .

Covid 19 मधे चांगले दिवस येणारे उद्योग 
1. FMCG  प्रोडक्त्त यात पर्सनल केअर , होम केअर , फूड      उतपादने
2. हॉस्पिटल आणी फार्मा इंडस्त्र , आयुर्वेद ,होमियोपेथीक ,
3.  इंटरटेन्मेन्ट मेडीया ,शोशिअल मेडीया , ब्रॉडकास्ट मेडीया
4.  फिटनेस आणी सप्लिमेंट्स
5.  ऑनलाईन शॉपिंग  ,वेब लर्निंग आणी मिटींग्स , ई कॉमर्स
6.  कुरियर & लॉजिस्टिक .
7. सॉफ्टवेअर .
तसेच तरुण वर्गाने नोकरी शोधण्या पेक्स आलेल्या संधीचा फायदा उचललायला हवा , या इडंस्त्री मधे उद्योग सुरु केला तर भविष्य चांगले आहॆ .
तसेच वर्क फ्रॉम होम ची नवीन पद्धत आता सुरु होत आहॆ .त्यामुळे महिलांनी याचा फायदा उचलावा ,काही क्षेत्रात वर्क फ्रॉम होम चे जॉब सुद्धा निघतील , नवीन नोकरीसाठी बाहेर पडणार्यांनी ही कोणत्या क्षेत्रात चांगली नोकरी मिळु शकेल याचा आधी विचार करावा , ऑनलाईन शॉपिंग कम्पन्यामध्ये चांगल्या नोकरी च्या संधी निर्माण झाल्या आहेत याचंच उदाहरण म्हणेज अमेझॉन सध्या 1 लाख नवीन जागा भरती करण्याच्या तयारीत आहॆ .
अजुन एक खुप मोठी संधी आपल्या समोर आहॆ ती म्हणजे छोटे छोटे लघु उद्यो योग्य प्रशिक्षणाने महिला किंवा बेरोजगार सुरु करू शकतात . हा व्हायरस चायनातून आल्यामुळे संपुर्ण जगाची नाराजी चायनावर आहॆ याचाच परिणाम म्हणुन जर आपल्या देशात चायनीज वस्तूवर बहिष्कार लोक करत आहेत ,याचा फायदा तरुण वर्गाने आणी महिलांनी घ्यावा .
जर चायनीज वस्तुंना आपण पर्याय देऊ शकलो तर एक मोठी उद्योग साधी आपल्यासमोर असेल , यामध्ये महिला किंवा सामान्य व्यक्ती ही थोडस प्रशिक्षण घेऊन काम सुरु करू शकतो .
यात खेळणी उद्योग खुप मोठा आहॆ ,तसेच लाईट च्या माळा ,दिवे ,आकाशकंदील ,बल्प , टॉर्च  यासारख्या वस्तु महिला ही सुरु करू शकतात यात इन्व्हेस्टमेंट कमी आहॆ आणी कमी जागेत ही सुरु करता येऊ शकतो .
आताच्या परिस्थिती महिला व नवउद्योजकांना खुप चांगली संधी निर्माण झाल्या आहेत .
काही उद्यो पुढील प्रमाणे सुरु होऊ शकतात .
1.कृषी मालावर प्रकिया उद्योग , फळे आणी भाज्यांवर             प्रक्रिया करून सुरूहोणारे उद्योग
2. दूध व्यवसाय आणी दुधापासून बनविलेल्या वस्तु
3. माल घरपोच सेवा देणे
4. आरोग्य चांगले राहण्यासाठी बनविलेल्या वस्तु , जसे            च्वनप्राश , चूर्ण , व्हिटॅमिन सप्लिमेंट्स असे
5.ऑनलाईन बिजनेस , ऑनलाईन मार्केटिंग सेवा , सोशल 6. 6. मेडीया , ब्लॉगिंग , विडिओ मेकिंग etc
7. ऑनलाईन प्रशिक्षण , काउन्सिलिंग
8. हाऊस किपींग तसेच क्लीनिंग मटेरिअल बनविणे . जसे        फिनेल ,हॅन्ड वॉश ,सोप ,क्लीनर ,etc

अश्या उद्योगामध्ये तोड्याश्या प्रयत्नाने ही जम बसवता येऊ शकतो ...या संधीच फायदा घ्यावा आणी परिस्थीला ला एका पॉसिटीव्ह दृष्टीकोनातून बघावं तरच आपण लवकर बाहेर पडु यातुन .
शेवटी फक्त एवढंच जितक्या लवकर आपण जगण्याची नवीन पद्धत ,नवीन टेक्नॉलॉजि आणी प्रोसेस शिकुन घेऊ तितक्या लवकर आपण पुन्हा उभे राहु ..
Can You Be Part Of Faster Adoption Of  New  Technology & New Process...

Be safe & TC....

Mrs. Megha Hanmant Pawar.

11 comments:

  1. Very nice and useful information

    ReplyDelete
  2. Very usefull information megha mam... aani aatta ya lockdown chya kalat आपण कोणत्या bussiness कडे
    जाऊ शकतो असे बरेच संधी आहेत असे सांगितले तुम्ही.... thanku

    ReplyDelete
    Replies
    1. Ujwala लोखंडे गगन भरारी गृप

      Delete
  3. Very helpful information shared megha mam

    ReplyDelete
  4. khup chhan information dilis mehga tai

    ReplyDelete
  5. khup chhan information dilis mehga tai

    ReplyDelete
  6. helpful information megha tai

    ReplyDelete
  7. Very nice information ....

    ReplyDelete
  8. Megha Tari
    Very nice and Useful information
    Khupcha 👌👌👍👍
    Gagan Bharari Group Thanks

    ReplyDelete

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

  स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागव...